अदानी प्रकरणातील राज ठाकरेंच्या आरोपाला उद्धव ठाकरेंचे जशास तसे उत्तर

अदानी यांचे (Adani Group) चमचे कोण आहेत, हे बघून मला वाईट वाटते , याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray) दिले आहे.

अदानी प्रकरणातील राज ठाकरेंच्या आरोपाला उद्धव ठाकरेंचे जशास तसे उत्तर

अदानी यांचे (Adani Group) चमचे कोण आहेत, हे बघून मला वाईट वाटते , याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray) दिले आहे. राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) धारावीतील (mumbai dharavi redevelopment project) उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सेटलमेंट झाली नाही म्हणून मोर्चा काढला जातोय का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

मला आता कळलं अदानीचे चमचे कोण आहेत. आम्ही अदानीला प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? मी धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलो आहे. उद्धव ठाकरे नागपुरातून बोलत होते. धारावीच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे निर्णय घेणार असाल, तर ते आम्ही कसे सहन करू? मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला, असेही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आमचे सरकार पाडले का? असा मी प्रश्न विचारला. भाजप असती तर सेटलमेंट झाली असती पण ते नव्हते. मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला. मुंबई विकायला गेलेल्या लोकांना काही चमचे बोलत आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.

नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, धारावीत होतेय ते योग्य नाही. मुंबईला संपवण्यासाठी हा डाव आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे मुख्यमंत्री आहात. धमकावून हे गुजरातला उद्योग नेहले जात आहेत. महाराष्ट्र हा देशाचा आधार आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी धारावीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्च्यावर प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे म्हणाले, कंत्राट काढून १० महिने झाले, आज का मोर्चा काढला जातोय ? की सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातोय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा.रिडेव्हलपमेंटसाठी एक प्लान असतो, तो त्यांच्याकडे आहे का? हे अदांनीना विचारा.शाळा किती, ओपन स्पेस किती? सगळं माहिती पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

विधानपरिषदेत एकनाथ खडसे यांनी केले गंभीर आरोप, गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध

पुण्यातील १९ वर्षीय विद्यार्थी इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये, एनआयए पोहचले घरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version