spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमच्या नेत्यांना काही बोललेलं खपवून घेणार नाही – नारायण राणे

दसरा मेळावा होऊन दोन दिवस झाले तरी राजकारणात अजून ही दसरा मेळाव्या संधर्बातच चर्चा सुरु आहे. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वर जहरी टीका करण्यात आली. दसऱ्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिव्या शाप देण्यासाठी हा मेळावा घेतला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी शिव्या शाप देण्यासाठीच सभा घेतली होती. कारण त्यांच्या भाषणातून वैचारिक आणि बौद्धिक काहीच नव्हते परंतु, फक्त शिव्याच होत्या, अशी टीका नारायण राणे यांनी केलीय.

पडसाद राज्याच्या राजकारणावर संमिश्र पद्धतीनं उमटताना दिसत आहे. ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कडाडून टीका केलीय. राणे यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकेचा वचपा काढला आहे.पत्रकार परिषदेमध्ये राणे म्हणाले, आमच्या नेत्यांना काही बोललेलं खपवून घेणार नाही. देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करु नका. काही झालं तरी उद्धव ठाकरे जबाबदार असतील. थोडी तरी मर्यादा ठेवा. तुम्ही मंत्रालयात येऊ शकत नाही. वीस मिनिटे हा माणूस चालू शकत नाही. त्याला सतत डॉक्टरांचा सल्ला लागतो. अशा एकेरी शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून आम्हाला विचारांची मेजवानी मिळत असे. त्यातूनच आमची जणघडण झाली. मोठ-मोठ्या लोकांची नावं घेऊन टीका केल्यानंतर त्यांना आपल्याला मोठं म्हणतील असे वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नावे गेऊन टीक केली. अडीच वर्षात फक्त अडीच तासच मंत्रालयात येणारे मुख्यमंत्री आहेत. मराठी माणसांसाठी यांनी काय केलं. केलं असतं तर मेळाव्यातून शिव्या देण्यापेक्षा अडीच वर्षात केलेली कामे सांगितली असती. आपण कोण आहोत याची ठाकरेंना जाणीव करून दिली पाहिजे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

“यांना वाकायला देखील डॉक्टर लागतो तर मग काय विधायक कामे हे करणार. मोदी यांचं नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली आणि त्यांचे लोकं निवडून आले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी लबाडी केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाबाबत बोलूच नये. उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय. शिवाय यांनी छोटा राजन आणि छोटा शकील यांना मला मारण्याची सुपारी दिली. परंतु, मी अजूनही जिवंत आहे, असा आरोप राणे यांनी केलाय. “यांना वाकायला देखील डॉक्टर लागतो तर मग काय विधायक कामे हे करणार. मोदी यांचं नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली आणि त्यांचे लोकं निवडून आले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी लबाडी केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाबाबत बोलूच नये. उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय. शिवाय यांनी छोटा राजन आणि छोटा शकील यांना मला मारण्याची सुपारी दिली. परंतु, मी अजूनही जिवंत आहे, असा आरोप राणे यांनी केलाय.

२०१९ च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. ती जिंकली. आणि आता मोदींवर टीका सुरु केली आहे. या माणसानं हिंदूत्वाबद्दल काहीही बोलू नये. त्याचे बेगडी हिंदूत्व आहे. मोदींचे नाव सांगून त्यानं आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. अशा शब्दांत नारायण राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

Goodbye : ‘गुडबाय’ला बायकॉट करा’; हिंदुस्तानी भाऊची मागणी…

अकासा एअरलाईन्सची नवी भेट, प्रवाशांना पाळीव प्राणी सोबत घेऊन जाता येणार आहे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss