ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षाला निवडणूक आयोगामुळे एक नवे वळण आले आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यावर अनेक राजकीय पक्षातील नेते आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचा नाव ही संपलं आणि चिन्ह ही कालाय तस्मै नमः ।
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 8, 2022
उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 9, 2022
धनुष्य बाण चिन्ह गोठवल गेलंय, या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही …
आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादी च “घड्याळ”नाहीतर अबू आझमी च्या “सायकल”चाच आधार आहे …
संपलेल्या पक्षा बद्दल बोलत नाही असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा …— Gajanan Kale (@GajananKaleMNS) October 8, 2022
आमची निशाणी 🚂
बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. ‘त्यांची’ जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती.असो,तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही. @AUThackeray #मनसे #MNS
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 8, 2022
हे ही वाचा:
सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे ; नाना पटोले
आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…