spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संभाजी ब्रिगेड संस्था कुणी स्थापन केली? आणि त्याचा इतिहास काय?

5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे संभाजी ब्रिगेड लोकांच्या नजरेस पडण्यास सुरुवात झाली

नुकतीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने युती केल्याची घोषणा केली आहे. तस भागह्याला गेलं तर या दोन्ही पक्षांचा इतिहास तसा आक्रमकच आहे. हिंदुत्व, शिवाजी महाराजांचे विचार, मराठी माणसाचे हक्क आणि अधिकार अशा विविध मुद्दयांबाबतीत या दोन्ही पक्षांमध्ये साधर्म्य दिसून येते. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आणि नावारूपास आलेला पक्ष आहे. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड हा शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आणि २०१६ साली राजकारणात आलेला पक्ष आहे. त्यामुळे आता भविष्यात आता ही युती भाजपला कशी ठक्कर देणार, हे पाहणे आता महत्तवाचे ठरणार आहे. पण त्यापूर्वी संभाजी ब्रिगेड नक्की कुणी स्थापन केले? आणि याचा इतिहास काय आहे जाणून घेऊया:

पुरुषोत्तम खेडेकर यांनी या 1 सप्टेंबर 1990 रोजी या मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती. मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असणारे पुरुषोत्तम खेडेकर हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता.

मराठा सेवा संघानं स्थापनेच्या काही वर्षांतच 32 ते 33 विभाग सुरू केले गेले आणि त्यातूनच पुढे जन्म झाला तो महिलांसाठीच्या जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठीच्या संभाजी ब्रिगेडचा.

संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या काही महत्तवाच्या भूमिका…
  • 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे संभाजी ब्रिगेड लोकांच्या नजरेस पडण्यास सुरुवात झाली. वादग्रस्त लेखक जेम्स लेनला भांडारकर संस्थेने चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ल्ला केला होता. या हल्ल्यात इमारतीची तसेच काही दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे नुकसान झाले.
  • गिरीश कुबेर लिखित ‘रेनेसाँ स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेक केली होती.
  • दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत असं म्हणत संभाजी ब्रिगेडने क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे आणि त्यांच्या नावाने शासनाने तर्फे देण्यात येणारा पुरस्कार रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती.
  • संभाजी ब्रिगेडकडून 1998 रोजी सनातन हिंदू धर्मापासून वेगळं होत शिवधर्माची स्थापना करण्यात आली. दहा वर्ष या धर्माचा प्रचार केल्यानंतर 2008 साली या धर्माचा प्रकटदिन सोहळा पुरोयषोत्तम खेडेकरांच्या उपस्थितीत साजरा झाला.
  • 2012 साली संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडली. त्यावेळी देखील संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेत संघर्ष उभा राहिला. त्यावेळचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पुढाकाराने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.
  • बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रातून राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीच्या गोष्टी मांडून बदनामी केल्याचा सातत्याने आरोप संभाजी ब्रिगेडकडून केला जातो. पुरंदरेंच्या आक्षेपार्ह लिखाणाला संभाजी ब्रिगेडने कायमच विरोध केला. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासही विरोध करण्यात आला होता.

हे ही वाचा:

मदर तेरेसा यांची ११२ वी जयंती: जाणून घ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित खास गोष्टी..

राज्यातील पहिले दिव्यांगांसाठी विशेष उद्यान नागपुरात लवकरच सुरु होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss