spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Anil Bonde मूर्ख माणूस, त्यांना अमरावतीत दंगल घडवायची आहे, Yashomati Thakur यांची संतप्त टीका

शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावर टीका करत राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावरून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतानाच आता भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. अनिल बोंडे यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा दाखला देत ‘राहुल गांधी जीभ छाटू नये पण जिभेला चटके द्यायला हवे,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी अनिल बोंडेंवर चांगलीच आगपाखड केली आहे.

यशोमती ठाकूर यांनी आज (बुधवार, १८ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत अनिल बोंडें यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. अनिल बोंडे हे मूर्ख माणूस असल्याची टीका करत त्यांना अमरावतीत दंगल घडवायची आहे म्हणून असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले आहे,’ असे त्या यावेळी म्हणाल्या.

अनिल बोंडे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे: यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्या यावेळी म्हणाल्या, “खासदार डॉ. अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे. एखादा अडाणी माणूस बोलला तर समजू शकतो पण हे तर डॉक्टर आहेत. बोंडे हे मूर्ख माणूस आहेत. त्यांना अमरावतीत दंगल घडवायची आहे, म्हणून असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही फेक नरेटीव्हचे बादशाह आहात. तुमचे हे चमचे आहेत, त्यांना पण जरा सांभाळा. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, महाराष्ट्राचे संतुलन बिघडवण्याचे काम हे लोकं करत आहेत,” असे त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते अनिल बोंडे?

अनिल बोंडे यांनी संजय गायकवाड यांच्या राहुल गांधींसंदर्भातील विधानावर प्रतिक्रया दिल्या . ते यावेळी म्हणाले, “संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची जीभ छाटू नये, जिभेला चटके मात्र दिले पाहिजे. मग ते राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत. भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ‘जीभ छाटू नये तर जिभेला चटके’ मात्र निश्चितच दिले पाहिजे,” असे ते म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेरिका दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात आरक्षणविषयक प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ‘जेव्हा योग्य वेळ येईल, देशात समानता येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. सध्या ती योग्य वेळ नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर विरोधकांकडुन चांगलीच आगपाखड करण्यात आली. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरुद्ध आंदोलनेदेखील करण्यात आली. अश्यातच सत्ताधारी नेत्यांकडून राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. भाजप नेता आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह (Tarwinder Singh Marwah) यांच्याकडून खुलेआमपणे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात अली होती. तसेच राज्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी “राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता अनिल बोंडे यांच्या वक्तव्याने या वादात आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss