spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विराटचे शतक पूर्ण होताच, पत्नी अनुष्काने शेअर केली खास पोस्ट

भारतीय फलंदाज विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.त्याने अफगाणिस्तानविरुद्ध आशिया चषक २०२२च्या सुपर ४ सामन्यात शतक झळकावले.यावर सर्व क्रिकेटपटू, क्रिकेट चाहते आणि सर्व लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.त्याने या सामन्यात १२२ धावांची नाबाद शतकी खेळी केली. याच कामगिरीनंतर विराटची पत्नी अनुष्का शर्माने त्याचे तोंडभरून कौतूक केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्यासोबत असेन, असे अनुष्का म्हणाली आहे.

व्हिटॅमिन-डी सप्लिमेंटेशन तुम्हाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवू शकत नाही

मागील साधारण दोन वर्षांपासून विराट कोहली धावांसाठी झगडत होता. या काळात अनेकवेळा तो शून्यावर बाद झाला. सातत्याने खराब कामगिरी करत असल्यामुळे विराटची कारकीर्द धोक्यात आली आहे, असेदेखील मत मांडले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा विराट आपल्या जुन्या अवतारात परतला आहे. त्याने आशिया चषकात धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडलंय. अफगाणिस्ताविरोधातील सामन्यात विराटने नाबाद १२२ धावा केल्यामुळे त्याची पत्नी अनुष्काने त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी, मी कायम तुझ्यासोबत असेन, असे अनुष्काने विराट कोहलीला उद्देशून आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराट कोहलीची बहीण भावना कोहलीने इंस्टा पोस्टमध्ये सिंहासारखी गर्जना करत लिहिले.देवा कृपयात्याचवेळी हरभजन सिंगने लिहिले की, “शाबास चॅम्पियन कोहली. तुझे शतक पाहून आनंद झाला.”सुरेश रैनाने लिहिले, “T20I क्रिकेटमधलं पहिलं शतक, कोहलीसाठी खूप आनंद झाला आहे. तुम्ही त्याच्यासाठी पूर्णपणे पात्र आहात. अशा अप्रतिम खेळीसाठी खूप खूप धन्यवाद.” असे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्रात सर्वत्र विसर्जनाचा जल्लोष मात्र अपघाताच्या घटनांमुळे लागतंय विसर्जनाला गालबोट

Latest Posts

Don't Miss