अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. त्याने हा सामना रिपेचेजमध्ये जिंकला असून, बजरंगचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील ५ वे पदक आहे. यापूर्वी बजरंगने एक रौप्य आणि तीन कांस्यपदक जिंकले आहेत. जागतिक स्पर्धेत इतकी पदके जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ही स्पर्धा बेलग्रेडमध्ये खेळवली जात आहे. या चॅम्पियनशिपमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. विनेश फोगटने कांस्यपदक दिले. यासह भारताने दोन पदकांसह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अभियान संपुष्टात आणले आहे.
4️⃣th Worlds medal for @BajrangPunia 🤼♂️
Our Tokyo Olympics BRONZE medalist has bagged a BRONZE🥉 again. This time at the Wrestling World Championships (FS 65kg) in Belgrade🤩
His World Championships CV now:
SILVER – 2018
BRONZE – 2013, 2019, 2022#WrestleBelgrade pic.twitter.com/vF1kOEEflL— SAI Media (@Media_SAI) September 18, 2022
हेही वाचा :
पवारांच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसीय दौरा
२८ वर्षीय भारतीय बजरंग पुनिया कुस्तीपटूने ६५ किलो वजनात जबरदस्त पुनरागमन केले आहे. तत्पूर्वी, तो पोर्तो रिकन खेळाडू सेबॅस्टियन रिवेरा याच्या मागे ६-० ने जात होता. त्यानंतर दमदार पुनरागमन करत ११-९ असा विजय मिळवला.बजरंग व्यतिरिक्त भारतातील अनेक महिला आणि पुरुष कुस्तीपटू जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताने या चॅम्पियनशिपसाठी ग्रीको-रोमन, फ्रीस्टाइल आणि महिला कुस्तीच्या ३० प्रकारांमध्ये एकूण ३० कुस्तीपटू पाठवले होते, त्यापैकी आतापर्यंत फक्त दोनच पदके जिंकली आहेत.
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं याआधी जागतिक कुस्ती स्पर्धेत २०१३, २०१८, आणि २०१९ मध्ये पदक जिंकलंय. त्यानं तिसऱ्यांदा कांस्यपदक जिंकलंय. तर, एकदा रौप्यपदकावर कब्जा केलाय. २०१८ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्यानं रौप्यपदक जिंकलं होतं. सर्बियाच्या बेलग्रेड येथे सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतानं ३० सदस्यांची टीम मैदानात उतरवली होती. परंतु, त्यापैकी फक्त दोन कुस्तीपटूंना पदक जिंकता आलंय.
बजरंग आणि विनेश फोगट व्यतिरिक्त, सागर जगलान (७४ किलो), नवीन मलिक (७० किलो) आणि निशा दहिया (६८ किलो) यांचा कांस्यपदकासाठी सामना झाला होता, परंतु त्यांना यश मिळवता आले नाही. याशिवाय ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता रवी दहिया याला स्पर्धेच्या सुरुवातीलाच धक्का बसला. त्याला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला.
खा.संजय राऊतांचा गरबा तुरुंगातच, न्यायालयाच्या ‘या’ निर्णयनाने शिवसेनेला धक्का