Friday, July 5, 2024

Latest Posts

विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी

टीम इंडियाने ११ वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं. तसेच 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. विजयानंतर टीम इंडिया भारतात पोहोचली तेव्हा त्यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Team India captain Rohit Sharma : टीम इंडियाने ११ वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं. तसेच 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. विजयानंतर टीम इंडिया भारतात पोहोचली तेव्हा त्यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईच्या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विश्वविजेता रोहित शर्मा, ऑलराउंडर शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आज वर्षा निवसस्थानी रोहित शर्मा आणि इतर खेळाडू आले होते. त्यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांनतर हे चारही खेळाडू विधानभवनात गेले.

राज्याच्या विधानभवनात (Vidhan Bhavan) आज जगजेत्त्या भारतीय क्रिकेट संघातील (T20 World Cup 2024 Winning Team India) मुंबईकर खेळाडूंचा सत्कार पार पडला. विधान भवनात पहिल्यांदा असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. खेळाडूंसाठी विधान भवनाच्या प्रांगणात लोककलाकार जमले होते. खेळाडू पोहचताच तुतारी वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलं. त्यानंतर लोककलाकारांनी या खेळाडूंचं औक्षण केलं. त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये आता या खेळाडूंचा खास सन्मान करण्यात येणार आहे. खेळाडू सेंट्रल हॉलमध्ये पोहचताच महाराष्ट्र गीत लावण्यात आलं. त्यानंतर दिग्गज सुनील गावस्कर यांनी गायलेलं गाणं लावण्यात आलं.

सत्कार सोहळ्यातील भाषणात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या उल्लेख महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख वॉईस कॅप्टन अजित पवार (Ajit Pawar) असा केला. यासोबत फडणवीसांनी टीम इंडियाच्या नावाने जोरदार जयघोष केला. देवेंद्र फडणवीसांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की, आपल्या महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे, सभागृहातील आपले अंपायर राहुल नार्वेकर, वाईस कॅप्टन अजित पवार, थर्ड अंपायर नाही म्हणता येणार त्यांना अंपायरच म्हणावं लागेल, अंपायर नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजींना काय म्हणायचं? अशी फडणवीसांनी फटकेबाजी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालचं खूप खूप कौतुक. आपल्या सर्वांसाठी अतिशय आज आनंदाचा क्षण आहे. ज्या अपराजित टीमने टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्या संघाच्या कर्णधारासह चार खेळाडूंचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी आनंद आणि दु:खही दिलं. वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून आनंद आणि निवृत्ती घेऊन दु:ख दिलं, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान टीम इंडियाची ही वर्ल्ड कप जिंकण्याची ही चौथी वेळ आहे. टीम इंडियाने १९८३ आणि २०११ साली वनडे वर्ल्ड कप जिंकला. तर २००७ नंतर यंदा टीम इंडियाने २०२४ साली वर्ल्ड कप जिंकला आहे. मात्र विधानभवनात टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सत्कार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss