“मी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती,” हार्दिक पांड्याने विराट कोहलीशी गप्पा मारताना मन केले मोकळे

“मी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती,” हार्दिक पांड्याने विराट कोहलीशी गप्पा मारताना मन केले मोकळे

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्या जेव्हा मैदानात उतरला तेव्हा ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १६० धावांचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरताना विराट कोहली मात्र मैदानात भक्कमपणे उभा होता. यानंतर त्याने हार्दिक पांड्याच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेलं. पाचव्या विकेटसाठी दोघांनी ११३ धावांची भागीदारी केली. भारताने चार गडी राखून हा सामना जिंकत यशस्वी सुरुवात केली आहे. दरम्यान सामना संपल्यानंतर हार्दिकने विराट कोहलीची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना हार्दिक पांड्याने विराट कोहलीसोबत फलंदाजी करतानाचा अनुभव सांगितला. १९ व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने रौफला लगावलेल्या सलग दोन षटकरांचंही पांड्याने कौतुक केलं.

पांड्या आणि कोहलीने प्रथम पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी हादरलेल्या जहाजाला स्थिर केले. ५० धावांच्या भागीदारीसह त्यांनी हळूहळू डावाची पुनर्बांधणी केली, नंतर ७५ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली. आणि डावाच्या शेवटच्या पाच षटकांमध्ये पांड्या शांत झाला असला तरी कोहलीने जबाबदारी स्वीकारली, वेग वाढवला आणि आक्रमण केले. अखेरच्या षटकात पंड्याचा विकेट पडला, पण दुसऱ्या टोकाला त्याच्या उपस्थितीने कोहली आणि भारतासाठी आश्चर्यकारक काम केले. विजयानंतर, भारताच्या विजयाचे दोन तारे एकत्र बसले, जिथे पंड्याने कोहलीला मनापासून सांगून टाकले. “विराट कोहलीने खेळलेले ते दोन फटके सर्वोत्तम होते. त्यातील एकही फटका लागला नसता तर ते आमच्या पुढे गेले असते. मी अनेक षटकार लगावले आहेत, पण ते दोन षटकार विशेष होते. मी त्यालाही सांगितलं की, मी इतकं क्रिकेट खेळलो आहे पण विराट कोहली वगळता कोणालाही अशाप्रकारे फटका लगावताना पाहिलेलं नाही,” असं हार्दिक पांड्याने म्हटलं आहे. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

“सामन्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे, आम्ही संघर्ष केला पण एकत्रितपणे विजय मिळवला. जर आम्ही मैदानात जाऊन फटके लगावत सहज विजय मिळवला असता तर तो कदाचित इतका विशेष नसता. आम्ही संघर्ष केल्याने तो विशेष आहे. आव्हान किती कठीण होत आहे याबाबत आम्ही सतत एकमेकांशी चर्चा करत होतो. पण पाकिस्तानलाही श्रेय दिलं पाहिजे. त्यांनी उत्तम गोलंदाजी केली. त्यांनी चांगली खेळी केली,” असंही हार्दिक पांड्याने सांगितलं. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना हार्दिक पांड्याने सांगितलं की “मला ड्रेसिंग रुममध्ये फार तणाव असल्याचं जाणवत होतं. हा एक मोठा सामना होता. पण माझ्याबद्दल माहिती नाही. कारण मी मैदानात गेल्या तेव्हा मनात भावनांचा गोंधळ नव्हता. येथे मला खेळायचं होतं आणि मी खेळतोय याचा आनंद होता”. पुढे त्याने विराटला म्हटलं की “मी त्यावेळी तुझ्यासाठी गोळीही झेलली असती, पण बाद होऊ दिलं नसतं. माझं ध्येय स्पष्ट होतं. जितका होईल तितका तुझा त्रास कमी करायचा होता. तू हे अनेकदा केलं आहेस आणि दबावात असतानाही इतकी चांगली खेळी तुझ्याशिवाय कोणी करु शकत नाही”.

हे ही वाचा :

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी विमानाचं टेकऑफ लांबवलं? – आयुष्मान खुराणा

१०० हून अधिक खासदारांचा ऋषी सुनक यांना पाठिंबा ; पंतप्रधानपद जवळपास निश्चित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version