T२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी मेलबर्नमध्ये अंतिम सामना होणार आहे. आता पाकिस्तानचा सामना दुसरा उपांत्य फेरीचा सामना जिंकणाऱ्या संघाशी होणार आहे. पाकिस्तानच्या विजयामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याच्या आशा वाढल्या आहेत. टीम इंडिया दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
T२० वर्ल्ड कप २०२२ चा दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. गुरुवारी अॅडलेडमध्ये हा सामना होणार आहे. यामध्ये टीम इंडियाच्या चाहत्यांना विजयाची अपेक्षा आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केले तर अंतिम फेरीत त्याचा सामना पाकिस्तानशी होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत असतील.
A century opening stand from Babar Azam and Mohammad Rizwan eased Pakistan into their third #T20WorldCup finals 💪#NZvPAK Report 👇https://t.co/wq84U3nZTf
— ICC (@ICC) November 9, 2022
हेही वाचा :
Bharat joda yatra : भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद
रिझवान-बाबर जोडी पुन्हा चमकली
१५३ धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं आज सुरुवातच दमदार केली. सलामीवीर बाबर आणि रिझवान यांना धडाकेबाज अशी अर्धशतकं ठोकली. बाबर ५३ धावा करुन बाद झाला, पण त्यानंतर रिझवानने झुंज कायम ठेवली. मोहम्मद हारिसनेही ३० धावांची साथ रिझवानला दिली. रिझवाननं पाकिस्तानकडून सर्वाधिक ५७ धावा केल्या. ज्यानंतर शानच्या नाबाद ३ धावांनी पाकिस्ताननं १९.१ षटकांत सामना जिंकत ७ विकेट्सनी विजय मिळवला. आता पाकिस्तान १३ नोव्हेंबर रोजी फायनल खेळणार आहे.
टीम इंडियाचे खेळाडू फॉर्मात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. २०२२ च्या T२० विश्वचषकातील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहिली तर ती प्रभावी ठरली आहे. माजी कर्णधार विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी स्फोटक खेळी खेळली आहेत. त्यामुळे टीम इंडियाला या दोघांकडून जास्त आशा असतील. केएल राहुल आणि रोहित संघाला चांगली सुरुवात देऊ शकतात. भारताच्या गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग चांगली कामगिरी करू शकतात. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना विजयाची अपेक्षा असेल.
हृतिकची प्रियसी सबा आझाद दिसणार रॉकेट बॉईजच्या दुसऱ्या सीझनमध्ये