Sunday, June 30, 2024

Latest Posts

T 20 World Cup : Pandya आणि Natasaचा व्हिडीओ कॉलवर संवाद ; नात्यात सर्वकाही अलबेल

ज्यावेळी हा सामना भारत जिंकला त्यावेळी एकच कल्लोळ, हर्षोल्हास झाला. हा आनंद गगनात मावेनासा होता. अश्यातच सर्वजण हा सामना विजयी झाला त्यावेळी या विजयानंतर भारताच्या प्रत्येक खेळाडूने आपापल्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला.

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत. तो म्हणजे टी २० विश्वचषक २०२४ (ICC T20 World cup 2024)  हा होय. हा टी २० विश्वचषक २ जून २०२४ रोजी सुरु झाला आहे. या सामन्यात गेल्या काही दिवसांपासून भारत विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपण सर्वानीच पहिला. आणि या टी २० विश्वचषक २०२४ चा कालचा दिवस म्हणजे २९ जून २०२४ रोजी शेवटचा सामना रंगणार होता. हा अटीतटीचा सामना अतिशय उत्तम पद्धतीने रंगला. तो आपण सर्वानीच काल पहिला. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह, अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली.

ज्यावेळी हा सामना भारत जिंकला त्यावेळी एकच कल्लोळ, हर्षोल्हास झाला. हा आनंद गगनात मावेनासा होता. अश्यातच सर्वजण हा सामना विजयी झाला त्यावेळी या विजयानंतर भारताच्या प्रत्येक खेळाडूने आपापल्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. अनेक खेळाडूंनी आपली पत्नी तसेच कुटुंबीयांना आनंदाने मिठी मारली. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मला व्हिडीओ कॉल करत आपला आनंद साजरा केला. याच उत्साहादरम्यान, सध्या हार्दिक पांड्याचा एक फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकचा (Natasa Stankovic) व्हिडीओ कॉल आला, असा नेटकरी तसेच पांड्याचे चाहते दावा करत आहेत.

दरम्यान नताशा व हार्दिक पंड्या यांच्या मध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा रंगली. नताशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या होत्या. त्या पोस्टचा आधार घेत या दोघांच्या नात्यातील धुसफुसीचा अंदाज लावला जात होता. विशेष म्हणजे यावेळच्या आयपीएल पर्वात हार्दिक पंड्या मैदानात असताना एकाही सामन्यात नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. या कारणामुळेही दोघांच्या नात्याच्या बाबतीत अफवांना उधाण आले.

या काळ झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) विजय झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या स्वकीयांना फोन कॉल, व्हिडीओ कॉल करून आपला आनंद साजरा करत होता. याच काळात हार्दिक पंड्यालाही एक व्हिडीओ कॉल आला. या व्हिडीओ कॉलमध्ये तो कोणाशीतरी बोलत असल्याचे दिसतेय. खाली मैदानावर बसून तो हा संवाद करतोय. या व्हिडीओ कॉलचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच फोटोंचा आधार घेत नताशा आणि पांड्या यांच्यात व्हिडीओ कॉल चालू होता, असा दावा केला जातोय. खरं म्हणजे हार्दिक नेमकं कोणाशी बोलत होता, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पण या निमित्ताने दोघांच्या नात्यात कसलीही नाराजी नाही, असे म्हणत पांड्याच्या चाहत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

याच सोबत टीम इंडियाच्या विजयानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे त्याने सामना संपताच सांगितले. दरम्यान, विजयानंतर त्याने आपली पत्नी अनुष्का शर्माला (Anushka Sharma) व्हिडीओ कॉल केला. अनुष्का आणि विराट यांच्यातील या संभाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विराटसोबतच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानेही (Rohit Sharma) आपला आनंद त्याची पत्नी रितिका सजदेहला (Ritika Sajdeh)आनंदाने मिठी मारली. या आनंददायी क्षणाचेही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

हा आनंदाचा क्षण प्रत्येक खेळाडूंनी आपल्या फॅमेलीसोबत साजरा केला आहे. सोबतच रोहित शर्मा व विराट कोहली आता टी २० विश्वचषकाला राम राम ठोकणार आहेत. तब्बल १७ वर्षानंतर हा विश्वचषक भारताकडे परतला आहे. त्यामुळे हा क्षण भारताच्या दृष्टिकोनातून खूप रोमांचकारी आहे. संबंध देशासाठी आनंदाचा असा दिवस आहे.

हे ही वाचा :

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss