Water salute म्हणजे काय? टीम इंडियाच्या विमानावर पाण्याचा वर्षाव का झाला?

T20 World Cup 2024 मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया प्रथम बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचली.

Water salute म्हणजे काय? टीम इंडियाच्या विमानावर पाण्याचा वर्षाव का झाला?

Team India Victory Parade : T20 World Cup 2024 मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया प्रथम बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचली. भारतीय संघाचे विमान दुपारी तीनच्या सुमारास दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास विस्तारा फ्लाइट क्रमांक ‘UK1845’ टीम इंडियाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले. या विमानाला विमानतळावर विशेष वागणूक देण्यात आली कारण खेळाडू बाहेर येण्यापूर्वी विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. टीम इंडियाच्या सन्मानार्थ दोन फायर इंजिन विमानाच्या दोन्ही बाजूला उभे राहून पाणी फवारताना दिसले. वॉटर सॅल्यूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक कमेंटमध्ये भारतीय संघाबद्दल खूप आदरही दाखवत आहेत.

वॉटर सॅल्यूट म्हणजे काय?

विमानातील क्रू मेंबर्स, त्यात बसलेले लोक आणि त्या विमानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी वॉटर सॅल्यूट दिला जातो. कोणतीही विशेष कामगिरी किंवा विक्रम घडवल्याबद्दल, वॉटर सॅल्यूटद्वारे आदर दर्शविला जातो. भारतीय संघाने 2024 चा T20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला असल्याने संघातील सर्व खेळाडूंना वॉटर सॅल्यूट देण्यात आला आहे.

मुंबई विमानतळावरून बाहेर आल्यानंतर टीम इंडियाला बसने मरीन ड्राइव्हवर परिसरात आली आहे. टीम इंडियाची विजय परेड नरिमन पॉइंटपासून सुरू झाली आहे. मरीन ड्राइव्हवर हजारो लोक जमले असून जय हिंद, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात आहेत. नरिमन पॉइंटवर पोहोचल्यानंतर भारतीय संघ खुल्या बसमध्ये चढेल ज्यामध्ये खेळाडू विजय परेडला सुरुवात करतील. त्यानंतर खेळाडू वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version