भारतीय क्रिकेट संघाचा पहिला विश्वचषक सामना दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहेत. तर चेन्नई येथे हा सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे तसेच जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत, कारण हे दोन्ही संघ विश्वचषक जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा असेल, कारण ऑस्ट्रेलिया हा एक मजबूत संघ आहे. भारताने हा सामना जिंकल्यास पुढील सामन्यांसाठी संघाचे मनोबल लक्षणीय वाढेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघही हाच विचार करत असावा. त्यामुळे या सामन्यात या दोन्ही संघातील काही खेळाडूंवर सर्व चाहत्यांची नजर असेल. आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडूंबद्दल सांगत आहोत.
विराट कोहली : शुभमन गिल खेळू न शकल्यामुळे भारतीय चाहते विराट कोहलीवर अधिक लक्ष केंद्रित करतील. विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे. अशा स्थितीत विश्वचषकातील या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विराट कोहलीकडून खूप अपेक्षा असतील. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
स्टीव्ह स्मिथ : विराटप्रमाणेच स्टीव्ह स्मिथ देखील ऑस्ट्रेलियासाठी नंबर-३ क्रमांकावर फलंदाजी करतो. स्टीव्ह स्मिथने गेल्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियासाठी काही चांगल्या खेळी केल्या आहेत. जेव्हा त्याची बॅट काम करते तेव्हा ती संघाला स्थिरता प्रदान करते. वेगवान गोलंदाजांसोबतच तो फिरकीही चांगला खेळतो, अशा स्थितीत चेन्नईच्या फिरकी ट्रॅकवर स्मिथची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
जसप्रीत बुमराह : या भारतीय वेगवान गोलंदाजाने अलीकडेच गंभीर आणि प्रदीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. बुमराहने पुनरागमन केल्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. त्याचा गोलंदाजीचा फॉर्म चांगला दिसत आहे. या विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केल्यास भारताला विश्वचषक जिंकणे खूप सोपे जाईल. अशा स्थितीत बुमराहची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
केएल राहुल : या वर्ल्ड कपमध्ये केएल राहुल एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी केएल राहुल यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणार आहे. त्यामुळे यष्टिरक्षणासह मधल्या फळीतील फलंदाजी सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. मधल्या फळीत त्याचा विक्रम चांगलाच राहिला आहे. गेल्या काही डावांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. तो क्रमांक-४ आणि क्रमांक-५ वर फलंदाजी करू शकतो, जरी श्रेयस अय्यर खेळत असला, तरी त्याला फक्त क्रमांक-५ वर खेळवण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, त्याने त्याच्या यष्टीरक्षण कौशल्यातही बरीच सुधारणा केली आहे आणि डीआरएस घेण्याचा निर्णय घेतानाही तो बर्याच वेळा योग्य असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात केएल राहुलवरही चाहत्यांची नजर असेल.
श्रेयस अय्यर : श्रेयसने एकदिवसीय फॉरमॅटच्या मधल्या फळीत भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो दुखापतग्रस्त असला तरी त्याने पुनरागमन करत नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया मालिकेतील एका सामन्यात शतक झळकावून आपल्या चांगल्या फॉर्मचे दर्शन घडवले. अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तो फिरकीचा चांगला खेळाडू आहे आणि त्याला चेन्नईच्या फिरकी ट्रॅकवर अॅडम झाम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याशी कठीण स्पर्धा होऊ शकते.
हे ही वाचा:
Asian Games 2023, टिळक वर्माने षटकारांचा वर्षाव करत पूर्ण केले अर्धशतक
Russia-Ukraine मध्ये वाद सुरूच, तब्ब्ल ५१ जणांचा मृत्यू, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले…
सिक्कीममध्ये महापूर, ४८ तासांपासून नागरिक बोगद्यात अडकले