उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात एका घरात लग्नाची तयारी सुरु असताना, अचानक तीन माजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला असलायची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत जात आहे.
#UPDATE | UP: Five people lost their lives while seven were injured after fire broke out in a 3-storey building in Moradabad. People of the same family were residing in the building. Fire dept conducting further probe to ascertain the reason: Shailendra Kumar Singh, DM, Moradabad https://t.co/dHNUTt8IyD pic.twitter.com/K32BLObSm9
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 25, 2022
हेही वाचा :
कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास होणार आता सुखकर
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात ही घटना घडली आहे अशी माहिती मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी माहिती दिली आणि म्हणाले, “मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. अग्निशमन दल आगीच्या कारणाचा तपास करत आहे.”
आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जाम, दोन तास वाहतूक बंद