बाळासाहेबांचा वारसा सांगताय मग मनसैनिकांच्या केसेस कधी मागे घेणार ? मनसेचा सवाल

बाळासाहेबांचा वारसा सांगताय मग मनसैनिकांच्या केसेस कधी मागे घेणार ? मनसेचा सवाल

बाळासाहेबांच्या मनाचा मोठेपणा हा एका वाक्यातून आपल्याला दिसून येतो. असा म्हणण्याचा कारण असं उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितलं आणि तो किस्सा मनसे च्या अधिकृत पेज वरून जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यान माध्यमाशी संवाद साधताना असताना त्याची आठवण करून दिली. १९९५ साली जेव्हा आमच्या कडे सत्ता आली तेव्हा मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे याना बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की , आज तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत काँग्रेस पक्ष विरोधी गटात आहे तरी ते आपल्या विरुद्ध आंदोलन , निदर्शने करतील परंतु पोलिसांकडून कधी चार्ज करायचा नाही. काहीही झाला तरी ती आपल्या महाराष्ट्रातली मुले आहेत.
YouTube video player
मनसे च्या अधिकृत पेजवरून उद्धव ठाकरे यांच्या वर काही गोष्टींबाबत विचारणा करता आली आहे. त्यात काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. आणि प्रकर्षाने असे म्हणण्यात आले आहे की, जर तुम्ही म्हणजेच महाविकासाआघाडी पक्ष आणि शिंदे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला मानतात आणि आम्ही त्यांचे विचार पुढे नेट आहोत असे म्हणता मग, आमच्या बाबतीत का त्रास दिला जात आहे अशी विचारणा केली. उद्धव ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना मशिदींवर जे त्रासदायक भोंगे होते ते उतरवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट नवनिर्माण सैनिकांना त्रास का दिला. १७००० महाराष्ट्र सैनिकानावर गंभीर स्वरूपाचे खटले का भरवण्यात आले अशी विचारणा करण्यात येत आहे. त्यावेळी तुम्ही हे विसरला होतात का असा जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विचारला जात आहे. बाळासाहेबांच्या इच्छापूर्तीसाठी आम्ही हे भोंगे खाली उतरवण्याचे आंदोलन केले होते हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुन्हा आहे का ?

तसेच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना विचारणा केली असता. ते देखील नेहमी म्हणतात आमचे सरकार हे बाळासाहेबांच्या विचारांचे आहे मग तरी देखील मशिदीवरील भोंगे आंदोलनात आमच्या महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या मुलं माउलींवर महाविकासघडीकडून खटले भरले गेले आहेत ते केव्हा मागे घेणार असा थेट सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्र्र नवनितर्मान सेनेची संघर्षाची घोडदळ अजून देखील चालूच आहे. परंतु एखाद्या प्रश्नावर आंदोलन करताना जेव्हा सरकारी बाळाचा वापर होतो, गाम्भीर स्वरूपाचे खटले थोपवून त्यांना आयुष्यातून उठविण्याचा प्रकार घाहोतो. अशा लोकांना किंवा कार्यकर्त्याना बाळासाहेबांच्या पाईक म्हणवून घेण्याचा काही अधिकार नाही.

Exit mobile version