spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार

१५ जून रोजी गुजरात किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या आगमनाने, राज्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे. कच्छ, देवभूमी, द्वारका आणि जामनगरमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. चक्रीवादळामुळं पोरबंदर, राजकोट, मोरबी, जुनागढ आणि सौराष्ट्र आणि उत्तर गुजरात प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. शुक्रवारी देखील दक्षिण राजस्थानमधील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम आणि जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थान सरकारने बिपरजॉय चक्रीवादळापासून बचावासाठी पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone biparjoy) गुजरातच्या दिशेनं सरकणार आहे असे वर्तवले गेले होते. त्याचबरोबर हे चक्रीवादळ अरबी समुद्राला धडकून पुढे जाणार असे देखील सांगण्यात आले आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. हे वादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं योग्य ती खबरदारी घेतली आहे.

६ जून रोजी अरबी समुद्रात बिपरजायची निर्मिती झाल्यापासून, बिपरजॉय सतत उत्तरेकडे सरकत होते अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. आणि त्याचा सांडतर्भात वारंवार सूचना आणि माहिती देखील दिली जात होती. तसेच ११ जून रोजी त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले होते ज्यांच्या वाऱ्याचा वेग ताशी १६० किमी पेक्षा जास्त होता. पण एका दिवसानंतर त्याची तीव्रता कमी झाली. त्याच्या आढावा घेऊन किनारी भागातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत ७४००० नागरिकांना सरक्षीतस्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून NDRF ची 33 पथके तैनात करण्यात आली आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम तेथील हवामानावर होत आहे. बुधवारी १४ जून रोजी गुजरातमधील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ हे गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या कच्छ, सौराष्ट्र प्रदेश, मांडवी किनारा आणि दक्षिण पाकिस्तानमधील कराचीच्या लगतच्या प्रदेशातून जाईल. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १६५किमी पर्यंत जाऊ शकतो. प्रक्रियेत ते थोडे कमकुवत होत आहे. यामुळं गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, बिपरजॉय मार्ग बदलून ईशान्य दिशेने कच्छ आणि सौराष्ट्रकडे वळणार आहे. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी ते जखाऊ बंदराजवळून पुढे जाईल. कच्छमध्ये बुधवारी ३.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. हवामान विभागानं अधिकाऱ्यांना गीर, सोमनाथ आणि द्वारका सारख्या लोकप्रिय ठिकाणी पर्यटकांच्या हालचाली मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे गवताची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची, तर कच्च्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि पक्क्या घरांचे किरकोळ नुकसान होण्याची शक्यता आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी तिन्ही सेना प्रमुखांशी चर्चा केली. चक्रीवादळ बिपरजॉयच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांच्या तयारीचा आढावा घेतला. सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सशस्त्र दल सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. तिन्ही सेना प्रमुखांशी बोलून बिपरजॉय चक्रीवादळाच्या संदर्भात सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेतला. लष्कर, नौदल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. गुजरातच्या किनारी भागातून आतापर्यंत ७४ हजारांहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना तात्पुरता निवारा छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. एकट्या कच्छ जिल्ह्यात सुमारे 34300 लोकांना, जामनगरमध्ये १०,००० मोरबीमध्ये ९२४३, राजकोटमध्ये ६०८९, देवभूमी द्वारकामध्ये ५०३५, जुनागढमध्ये ४६०४ पोरबंदर जिल्ह्यात ३४६९ आणि सोमनाथ जिल्ह्यात ५००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

चक्रीवादळाचा संभाव्य ठोठावण्यापूर्वी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) गुजरात आणि महाराष्ट्रात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी एकूण ३३ टीम्स नेमल्या आहेत. NDRFच्या १८ तुकड्या गुजरातमध्ये ठेवण्यात आल्या आहेत, तर एक टीम दीवमध्ये तैनात करण्यात आली आहे. दीवच्या उत्तरेला गुजरातमधील गिर सोमनाथ आणि अमरेली जिल्ह्यांनी आणि तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले आहे. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या तैनातीबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, कच्छ जिल्ह्यात एनडीआरएफच्या चार, राजकोट आणि देवभूमी द्वारकामध्ये प्रत्येकी तीन, जामनगरमध्ये दोन, पोरबंदर, जुनागढ, गिर सोमनाथ, मोरबी, वलसाड आणि गांधीनगरमध्ये प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. एक टीम तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात, एकूण १४ NDRF टीमपैकी पाच मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत. तर बाकीच्या टीम स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक टीममध्ये सुमारे ३५ ते ४० कर्मचारी आहेत. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सर्व 6 सार्वजनिक समुद्रकिनाऱ्यांवर १२० जीवरक्षक नेमण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे.

हे ही वाचा:

अजित पवारांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

लाच घेणारे तीन पोलीस हवालदार निलंबित!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss