Rahul Gandhi चे लग्न? पहिल्यांदाच केलं लग्नाच्या मुद्द्यावर भाष्य, अखेर मनातली ‘ती’ गोष्ट आली ओठांवर

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रे दरम्यान राहुल गांधी अनेक लोकांना भेटत आहेत.

Rahul Gandhi चे लग्न? पहिल्यांदाच केलं लग्नाच्या मुद्द्यावर भाष्य, अखेर मनातली ‘ती’ गोष्ट आली ओठांवर

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रे दरम्यान राहुल गांधी अनेक लोकांना भेटत आहेत. अनेकांशी चर्चा करत आहेत. विविध वर्गातील लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्याशी हितगूज साधून त्यांच्यात आपुलकी निर्माण करत आहेत. यावेळी नागरिकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही ते देत आहेत. यावेळी एका इंटरव्ह्यूववेळी त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी पहिल्यांदाच मनमोकळेपणानं उत्तर दिलं. त्यांना कशी पत्नी हवीय याची माहिती देताना राहुल गांधी यांनी दिलखुलास उत्तर दिलं.

 पुढे ते म्हणाले, कोणी मला ‘पप्पू’ म्हणून संबोधले तर वाईट वाटत नाही, कारण हा सर्व अपप्रचाराचा भाग आहे. असं बोलणारे स्वत:च त्रस्त आणि घाबरलेले आहेत, असंही उत्तर राहुल गांधी यांनी दिलं. हा अपप्रचाराचा भाग आहे. जो बोलत आहेत त्यांना भीती आहे, त्याच्या आयुष्यात काहीच चांगलं नाही, त्यांचे नातेसंबंध चांगले नाहीत. जर मला शिवी देऊन त्यांना बरं वाटत असेल तर द्यावी, मी त्याचं स्वागत करेन. मी कोणाचाही द्वेष करत नाही. तुम्ही मला शिव्या देता… मी तुमचा तिरस्कार करणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

हे ही वाचा:

अधिवेशनाचा आज ९ वा दिवस, अनेक ठराव, प्रस्तावावर शिक्कामोर्तब?

मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा काँग्रेस पक्षाची सत्ता आणू, नाना पटोले यांचं मोठं विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version