spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय अक्षय ऊर्जा दिवस २०२२: राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिनाचा इतिहास आणि महत्त्व

2004 मध्येया दिवसाची सुरुवात झाल्यापासून, अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

पृथ्वीवरील संसाधने धोकादायक गतीने कमी होत आहेत. शिवाय, या संसाधनांवर मानव इतका अवलंबून आहे की एकाएकी जर हि संसाधन नाहीशी झाली तर मानवाला येणाऱ्या परिस्तिथीला तोंड देणे कठीण जाणार आहे. परंतु जगभरातील अनेक कंपन्या पुढाकार घेत बदल घडवून आणण्यासाठी आणि लोकांना उर्जेच्या नूतनीकरणयोग्य संसाधनांकडे वळण्यासाठी प्रेरित करण्याचे कार्य करत आहेत. असाच एक उपक्रम म्हणजे अक्षय ऊर्जा दिवस.

2004 मध्येया दिवसाची सुरुवात झाल्यापासून, अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ज्या तारखेला हा दिवस साजरा केला जातो त्या तारखेला आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती देखील आहे.

ही एक जागरूकता मोहीम आहे ज्याचा उद्देश जनतेला त्यांच्या जीवनातील आणि पृथ्वीवरील अक्षय ऊर्जा संसाधनांच्या फायद्यांबद्दल प्रबोधन करणे आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारताच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोत मंत्रालयासोबत (MNRE) पॉवर स्टेशन म्हणून ही मोहीम प्रथम दिल्लीत आयोजित केली होती. या कार्यक्रमात 12000 शालेय विद्यार्थ्यांनी कार्यक्षम आणि हरित ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली होती.

ही मोहीम प्रामुख्याने शाळा आणि महाविद्यालयांना लक्ष्य करते आणि देशातील तरुण पिढीमध्ये जागृती निर्माण करते कारण त्यांच्याकडे भविष्याची गुरुकिल्ली आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर्स आणि बॅनरसह रॅली आणि घोषणा-लेखन यासारखे विविध कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये शाळा प्रशासनाकडून आयोजित केले जातात. 2012 मध्ये अशा प्रकारची पहिलीच बॅटरीवर चालणारी दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती.

एका अहवालानुसार, भारत हा विजेचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. नूतनीकरणीय संसाधनांमधून निर्माण झालेल्या एकूण ऊर्जा क्षमतेच्या 373GW पैकी 136GW सह नूतनीकरणक्षम उर्जेचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक देखील आहे. भारतासाठी पुढील लक्ष्य साध्य करण्यासाठी हरित संसाधनांद्वारे 225GW ऊर्जेचे उत्पादन हे आहे. विशेष म्हणजे, अक्षय ऊर्जा संसाधनांच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय असलेला संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश आहे.

हे ही वाचा:

या दिवशी साजरा होणार गणपतीच्या आगमनाचा सोहळा, जाणून घ्या गणेश चतुर्थीची तारीख आणि वेळ

Latest Posts

Don't Miss