जॅक डोर्सींने केले मोदी सरकारवर गंभीर आरोप

तंत्रज्ञाच्या युगात ट्रेंडिंग असलेले ट्विटर संदर्भात मोठी बातमी हाती आली आहे. ट्विटवर हा सगळ्यात लोकांच्या पसंतीस पडता दिसत आहे. हल्ली सगळ्यांचेच ट्विटर अकाउंट आपण बघत असतो.

जॅक डोर्सींने केले मोदी सरकारवर गंभीर आरोप

तंत्रज्ञाच्या युगात ट्रेंडिंग असलेले ट्विटर संदर्भात मोठी बातमी हाती आली आहे. ट्विटवर हा सगळ्यात लोकांच्या पसंतीस पडता दिसत आहे. हल्ली सगळ्यांचेच ट्विटर अकाउंट आपण बघत असतो. आणि त्यावर नेहमी प्रत्येकाचा काही ना काही हॅशटॅग्स सुरूच असतात. त सध्या ट्रेंड बनला आहे. यातच ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी मोठा खळबळजनक दावा केल्याचे दिसून आले. आणि हा दावा त्यांनी मोदी सरकारवर केला आहे. मोदी सरकारने शेतकरी आंदोलना दरम्यान ट्विटरला धमकावलं होतं असा गंभीर आरोप ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केला आहे. तसंच जॅक डोर्सी यांनी असाही दावा केला आहे की ट्विटरला असंही सांगण्यात आलं होतं की मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद करा. आम्ही असं केलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु आणि कर्मचाऱ्यांच्या घरी छापेमारी करु अशी धमकीच आम्हाला देण्यात आली होती. सोमवारी युट्यूब चॅनल ब्रेकिंग पॉईंटला दिलेल्या मुलाखतीत जॅक डोर्सी यांनी हा दावा केला आहे.

या मुलाखतीत जॅक डोर्सींना याना अनेक सवाल विचारण्यात आले होते. मुलाखती दरम्यान शक्तिशाली लोकांविषयी प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी त्यांनी भारताचं नाव घेतलं नाही पण या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की शेतकरी आंदोलना दरम्यान आम्हाला धमक्या देण्यात आल्या होत्या. जगभरातले अनेक शक्तीशाली लोक तुमच्याकडे येतात. विविध प्रकारच्या मागण्या देखील करतात.तेव्हा त्याने या प्रश्नाचा उत्तर देतानाभारताचं नाव पुढे केलं आणि त्यांनी तो किस्सा सांगितला. भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरु होतं तेव्हा आमच्याकडे बऱ्याच मागण्या आल्या. दिल्लीच्या सीमेवर हे शेतकरी पाच महिन्यांहून अधिक काळ बसले होते. शेतकऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या सरतेशेवटी सरकारने कायदे मागे घेतले आणि हे आंदोलन संपलं. आता याच आंदोलनाबाबत जॅक डोर्सी यांनी धक्कादायक दावे केले आहेत. काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते. त्यांच्याविषयीच्या या मागण्या होत्या. एक प्रकारे आम्हाला हा इशाराच दिला गेला की आमचं ऐकलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु. भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. तसं केलं नसतं तर आमची कार्यालयं बंद करण्यात आली असती, तसंच कर्मचाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली असती. हे भारतात घडलं आहे. जो एक लोकशाही देश आहे असंही डोर्सी यांनी म्हटलं आहे. प्रशांत भूषण यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांचं धोरण निष्काळजी आहे असं म्हणत डोर्सी यांनी त्यांच्यावरही टीका केली. एलॉन मस्क हे आमचे क्रमांक एकचे युजर होते आणि ते चांगले ग्राहकही होते. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांचं धोरण निष्काळजीपणाचं आहे असंही डोर्सी यांनी सांगितलं आहे. जॅक डोर्सी यांनी ट्विटर बोर्डाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भारत सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान कसा दबाव आणला होता त्याची माहिती दिली आहे. अनेक ट्विटर हँडल्स ब्लॉक करण्यासाठी ट्विटरवर दबाव होता असं त्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या जाहिरातीवर अतुल लोंढे काय म्हणाले…

७० हजार तरुणांना मिळणार सरकारी नियुक्तीपत्र!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version