दोन दिवसापासून पुरात अडकलेल्या 22 जणांना गडचांदूर पोलीसांनी बाहेर काढले

दोन दिवसापासून पुरात अडकलेल्या 22 जणांना गडचांदूर पोलीसांनी बाहेर काढले

द्रपूर जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सूरू आहे. इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले असुन आता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुर स्थिती निर्माण झाली आहे. गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ दोन दिवसापासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने २२ वाहनचालकांना बाहेर काढले.

Exit mobile version