मागास वर्गीयांना आपला हक्क देणारा हा निकाल आहे मंत्री जितेंद्र आव्हाड

मागास वर्गीयांना आपला हक्क देणारा हा निकाल आहे मंत्री जितेंद्र आव्हाड

ओबीसींना आरक्षण मिळाले, याचा आनंद आहेच. 340 कलम संविधानामध्ये आणून ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. त्यांच्या भूमिकेमुळेच मंडल आयोग स्थापन झाला. पवार साहेबांनी सर्वप्रथम मंडल आयोगाच्या महाराष्ट्रात लागू केला आणि ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाले. काही नतद्रष्टांनी त्या आरक्षणाच्या आड येण्याचा प्रयत्न केला. कोर्ट कचेरी केली. पण, आज अखेरीस मा. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या बाजूने निकाल दिला. आणि 27 टक्क्याचे हक्काचे आरक्षण त्यांना परत मिळाले. तळागाळातील शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही माझी कायमची भूमिका आहे. इथल्या शोषित उपेक्षित समाजाला ताकद देण्यासाठी आरक्षण हे हवेच. जर तुम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहावर यायचे असेल तर तुम्हाला राजकारणात यावे लागेल. इतर मागास वर्गीय लोकांना आपला हक्क देणारा हा निकाल आहे. राजकीय आरक्षण हे हवच.

Exit mobile version